Monday, August 31, 2009


 

 चालण्यासठी वाट असते..वाटेसाठी चालणे नसते,
उंच भरारी मारणा-याला ..आभळाचे भान नसते.


आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं..त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं...

 
तुला भेटण्यासाठी मी ,एक एक क्षण मोजत आहे ,कस मी सांगू तुझ्याशिवाय ,इथे मी कशी जगत आहे ..


मी दंग राहते माझ्याशी , कधी शब्दांशी, कधी कवितांशी ..
मी अशीच आहे खुळी पौर्णिमा, दंग राहते चंद्राशी.. मी दंग राहते माझ्याशी !!



आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.

 
पारिजातकाचं आयुष्य लाभल तरी चालेलं, पण लयलुट करायची ति सुंगधाचिचं ...

 
एवढ्याश्या आयुष्यात खूप काही हवे असते,पण हवे असते तेच मिळत नसते...हवे तेच मिळाले तरी खूप काही कमी असते, चांदण्या नि भरून सुद्धा आपले आभाळ रिकामे असते.


सप्तरंगी इंद्रधनुसारखे आयुष्य हवे असेल तर, पावसाचा ओलावा आणि सूर्याची धग एकत्र सोसण्याची तयारीही असावी.


हसायच्या आधी मला जरा सराव करावा लागतो,मनावरचा घाव  बराच दाबून धरावा लागतो  ...

;;